जामखेड टाईम्स वृत्तसेवा । पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilyabai Holkar) यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी (Choundi) विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारने 4 कोटींचा निधी (4 crore sanctioned) मंजूर केला आहे अशी माहिती आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमांतून राज्य सरकारकडून 1995 सालापासून विकास केला जात आहे.
माजी ग्रामविकास मंत्री तथा जेष्ठ नेते आण्णा डांगे यांच्या पुढाकारातून चौंडीचा कायापालट झाला आहे. डांगे यांच्या माध्यमांतून चौंडी देशपातळीवर झळकली. गेल्या अनेक दिवसांपासून चौंडी विकास प्रकल्पातील अनेक विकास कामे निधी अभावी रखडली होती.
माजी मंत्री आण्णा डांगे यांच्याकडून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. तसेच आमदार रोहित पवार हेही पाठपुरावा करत होते. अखेर सरकारने चौंडी विकास प्रकल्पासाठी 4 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
- Shiv Sena Candidate List : शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर, शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा संधी !
- SRH vs MI : हैदराबादने उभारली IPLच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या, ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरीक क्लासेन, एडन मारक्रम यांनी मुंबईच्या गोलंदाजांच्या केल्या चिंधड्या !
- Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीचे भूमिपूजन कधी होणार? आमदार प्रा राम शिंदेंची मोठी घोषणा, राम शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांचे वस्त्रहरण !
- जामखेड : अखेर सिंचन विहीरींची चौकशी थांबली, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मध्यस्थीला यश !
- Shivaji Adhalrao Patil : अखेर शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश, शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव विरुद्ध कोल्हे सामना रंगणार
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चौंडी गाव देशाच्या पर्यटन नकाशावर झळकावे याकरिता सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. चौंडी पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 4 कोटी 13 लाखाच्या निधीतून अनेक कामे राबवली जाणार आहेत. चौंडीतून वाहणाऱ्या सिना नदीचे सुशोभिकरण केल्यास पर्यटनात अधिक वाढ होण्यास मदत होईल.
कर्जत – जामखेड मतदारसंघात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा विकास झाल्यास या भागात पर्यटनाच्या माध्यमांतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टीनेच आमदार रोहित पवारांकडून मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा करत आहेत. याला मोठे यश येताना दिसत आहे.