जामखेड टाईम्स वृत्तसेवा । पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilyabai Holkar) यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी (Choundi) विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारने 4 कोटींचा निधी (4 crore sanctioned) मंजूर केला आहे अशी माहिती आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमांतून राज्य सरकारकडून 1995 सालापासून विकास केला जात आहे.
माजी ग्रामविकास मंत्री तथा जेष्ठ नेते आण्णा डांगे यांच्या पुढाकारातून चौंडीचा कायापालट झाला आहे. डांगे यांच्या माध्यमांतून चौंडी देशपातळीवर झळकली. गेल्या अनेक दिवसांपासून चौंडी विकास प्रकल्पातील अनेक विकास कामे निधी अभावी रखडली होती.
माजी मंत्री आण्णा डांगे यांच्याकडून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. तसेच आमदार रोहित पवार हेही पाठपुरावा करत होते. अखेर सरकारने चौंडी विकास प्रकल्पासाठी 4 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
- कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास कामांचा ‘शिंदे पॅटर्न’ जोमात,महायुती सरकारकडून 25 रस्त्यांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांचा निधी मंजुर !
- जामखेड : संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या हस्ते हाळगाव कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न !
- Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीचे होणार रुपरेखा सर्व्हेक्षण, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मिळाले मोठे यश !
- जामखेड : हळगाव कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता पदी डॉ अनिल काळे रुजू !
- … तर जामखेड महावितरण कार्यालयासमोर जनावरे आणून बांधू – प्रशांत शिंदे यांचा इशारा, रास्ता रोको अंदोलनाच्या दणक्यानंतर महावितरणला आली जाग, प्रशांत शिंदेंनी गाजवले रास्ता रोको अंदोलन !
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चौंडी गाव देशाच्या पर्यटन नकाशावर झळकावे याकरिता सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. चौंडी पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 4 कोटी 13 लाखाच्या निधीतून अनेक कामे राबवली जाणार आहेत. चौंडीतून वाहणाऱ्या सिना नदीचे सुशोभिकरण केल्यास पर्यटनात अधिक वाढ होण्यास मदत होईल.
कर्जत – जामखेड मतदारसंघात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा विकास झाल्यास या भागात पर्यटनाच्या माध्यमांतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टीनेच आमदार रोहित पवारांकडून मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा करत आहेत. याला मोठे यश येताना दिसत आहे.