जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा 39 दिवसानंतर विस्तार झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दोन दिवस उलटले तरी अजूनही खातेवाटप करण्यात आलेले नाही. येत्या 15 ऑगस्ट रोजी कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार असा प्रश्न उपस्थित झालेला असतानाच ध्वजारोहणासाठी सरकारने मंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर करत सुरु असलेल्या चर्चांवर पडदा टाकला आहे.

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन 40 – 45 दिवस उलटून गेले आहेत. सरकारकडून अजूनही पालकमंत्र्यांची घोषणा केलेली नाही. तसेच खातेवाटपाचा तिढा अजून कायम आहे. अश्यातच ध्वजारोहण करण्याबाबतची मंत्र्यांची यादी सरकारने जारी केली आहे. काही जिल्ह्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते कोणत्या जिल्ह्यात होणार ध्वजारोहण ?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – नागपुर
राधाकृष्ण विखे-पाटील – अहमदनगर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपुर
चंद्रकांत पाटील – पुणे
गिरीश महाजन – नाशिक
दादा भूसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
रविंद्र चव्हाण – ठाणे
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भूमरे – औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर)
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावीत – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद (धाराशीव)
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
अमरावती जिल्ह्यात विभागीय आयुक्त आणि कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर आणि नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलीय.
मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका करण्यात येतेय. मंत्रिपदावरुन शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचा दावा विरोधक करत आहेत. अशावेळी भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांत खातेवाटप होईल असा दावा केलाय. शिंदे गट आणि भाजपमध्ये एकवाक्यता आहे, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय.