नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ; आमदार रोहित पवार यांची महसुल आणि कृषीमंत्र्यांकडे मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये सुध्दा पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.

Provide immediate assistance to the affected farmers, MLA Rohit Pawar's demand to Revenue and Agriculture Minister

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबईत भेट घेतली आहे.

जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय पूर्ण क्षमतेने चालावं यासाठी आमदार रोहित पवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुंबईत त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन रिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरण्यात यावी, तसेच शेती व पिण्यासाठी पाणी परवाना व भरीव निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी केली आहे.

सोबतच मतदारसंघात वैयक्तिक शेततळ्यांचा लक्षांक वाढवून देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही मंत्री महोदयांनी तात्काळ दिले.

यासोबतच जमीन नावावर नसल्याने घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसलेल्या नागरिकांच्या नावे शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आ. रोहित पवार भेटले. शेतकरी व विद्यार्थी हितासाठी केलेल्या मागणीवर सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मतदारसंघातील विविध विषय मार्गी लागावे यासाठी पालकमंत्री राराधाकृष्ण विखे-पाटील व कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेबांची भेट घेतली. तसेच जामखेड शहरामध्ये अनेक लोकांना जमीन नावावर नसल्याने घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जामखेड शहराजवळ असलेली अतिरिक्त शासकीय जमीन बेघर लोकांच्या नावे करून त्यांना घरकुलचा लाभ मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचीही भेट घेऊन त्यांना विनंती केली अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.