शिंदे ठाकरे वादाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबली, आता ‘या’ तारखेला होणार सुप्रीम कोर्टात निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम अंक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. शिवसेना कोणाची ? आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, निवडणूक आयोगाची नोटीस यावर 1 ऑगस्टला फैसला होणार होता परंतू सुप्रीम कोर्टाने 16 आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे.आता ही सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडणार आहे का ? अशी चर्चा आता राज्यात सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना पक्षावर दोन्ही गट दावा करत आहेत. आता यात नेमका दावा कोणाचा योग्य हे ठरवण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावली होती.

या नोटीसनंतर शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शिवसेनेतील अंतर्गत वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून शिंदे गटातील आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. एवढ नाही तर सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात मात्र तारीख पे तारीख अशी अवस्था आता. सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल येणार की पुन्हा सुनावणी पुढे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या तीन होणार अशी चर्चा सुरू झाली होती परंतू मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुध्दा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.