अग्निशमन दलाने वाचवले 12 जणांचे प्राण,पुण्यात पावसाचा धुमाकूळ,पाण्यात अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाने केली सुखरुप सुटका !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पुणे शहरात सोमवारी रात्री पावसाने हाहाकार माजवला होता. अतिवृष्टीने पुण्याची दाणादाण उडाली होती. शहरातील सर्वच भाग जलमय झाला होता. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.शहरातील अनेक भागात पाणी शिरले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पुराच्या पाण्यात अनेक जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी भर पावसात पाण्यात अडकलेल्या १२ जणांची सुखरुप सुटका केली.

12 lives were saved by fire brigade, heavy rains in Pune, 12 people trapped in water were rescued by Pune fire brigade

पुणे अग्निशमन दलाकडे सोमवारी रात्री दहा वाजेपासून विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.

तसेच सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.

विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामध्ये तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.

कोंढवा खुर्द येथून सुटका केलेले नागरिक

वीरेश धारप्पनवर (वय 45)
विशेष नवीन  – वय 17
वरुण चव्हाण – वय 17
वैष्णवी चव्हाण – 12
वैभव चव्हाण – 09
राजेंद्र चव्हाण – 45
महेश काटे – 25
अनिकेत कदम – 25