अहमदनगर । विजय डोळे | कर्जत-जामखेडमध्ये ‘कायम वजनात’ असणाऱ्या भाजपाची आजची अवस्था पाहता नेमकं इथं चाललंय काय ? असा प्रश्न कोणाला पडला नसेल तर नवलच. त्याला कारण असे की, मागील काही दिवसांपासून मतदारसंघात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे सुरु असलेले राजीनामास्त्र, खरं तर आतापर्यंत हे गांभीर्याने घेण्यासारखं अजिबात नव्हतं कारण ‘भेळ तिकडे खेळ’ उक्तीप्रमाणे जिकडे सत्ता असते तिकडे गल्लीतील नेतेमंडळी चिटकत असातात.
चर्चेतल्या बातम्या