Picnic Spot Mumbai | जीवाची मुंबई करायचीय ? मग मुंबई जवळच्या या ठिकाणांना आवर्जून भेट द्या

Picnic Spot Mumbai | पावसाळा आला रे आला की निसर्गरम्य ठिकाणांकडे पर्यटकांचे पाऊले हमखास वळतात. कोणी कुटुंबासह, कोणी मित्रांसह तर कोणी मैत्रिणींसोबत सहलीला जाण्याच्या तयारीत असतात. पावसाळी पिकनिकची मजा काही औरच असते. एकदा का सहलीला जायचं ठरलं की, मग कुठे जायचं ? यावर चर्चा होते. मग मित्रांकडे चौकशी केली जाते किंवा टुरिझम एजन्सीची मदत घेतली जाते नाही तर मग थेट गुगलची मदत घेऊन योग्य पिकनिक स्पॉटचा शोध घेतला जातो. परंतू तुमचे हेच टेन्शन दुर करण्याचा या छोट्याशा लेखातून आम्ही प्रयत्न करणार आहोत.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराविषयी जगभरातील लोकांमध्ये मोठे आकर्षण आहे. मुंबईला एखादा व्यक्ती जाऊन आला की, त्याला, आला का जीवाची मुंबई करून हे हमखास विचारले जाते. ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय, सामाजिक, औद्योगिक, चित्रपट सह आदी गोष्टींनी सर्वगुणसंपन्न अशी मुंबई आणि तिचा सभोवतालचा परिसर डोळ्यात साठवण्याची मजा काही औरच असते. म्हणूनच आम्ही या मुंबईच्या आसपासच्या भागातील काही प्रसिद्ध पर्यटनस्थळांची माहिती देत आहोत.

लोणावळा – खंडाळा : लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या अगदी काही तासांवर वसलेले भारतातील महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणांना भारतात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणचे पावसाळ्यातील चित्र म्हणजे जणू निसर्गाने केलेली मुक्त उधळण असते. उंच डोंगर, धबधबे, हिरवेगार दाट जंगल, किल्ले, लेणी हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. याचबरोबर याठिकाणी मनोरंजन पार्क थीम पार्क कॅम्पिंग पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग यासारख्या ऍक्टिव्हिटीमुळे प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.

कर्जत – पावसाळ्यात विलोभनीय धबधबे शिवाय धरणाच्या सांडव्यातून वाहणारं पाणी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतं. त्याशिवाय येते अनेक रिसॉर्टही आहेत. एक दिवसाच्या पिकनिकसाठी मुंबईकरांना हा उत्तर पर्याय असू शकतो.

अलिबाग – अलिबागमध्ये अनेक समुद्र किनारे आहेत. त्यामुळे हा परिसर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरलाय. एक दिवसाच्या पिकनिकसाठी मुंबईकरांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

चिंचोटी – पावसाळयात धबधब्याला तरुणाईची विशेष पसंती असते. कडेकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहण्यात एक वेगळी मजा येते. पावसाळयात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिंचोटी धबधब्याकडे तरुणाईची पावले वळतात. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्द हिरव्यागार झाडीतून मार्ग काढावा लागतो.

माथेरान – महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. हे मुंबईपासून जवळ असलेले पर्यटन स्थळ आहे. माथेरानचे निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. पावसाळयात माथेरानचे जंगल पालथे घालणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. माथेरान मुंबईपासून 100 तर पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.

संजय गांधी नॅशनल पार्क – बोरिलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क हे सहलीसाठी असलेले एक उत्तम ठिकाण आहे. मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पावसाळयात एक वेगळा अनुभव मिळतो. वेगवेगळया प्रकारची झाडे, वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे.

गोराई – गोराई समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. बोरीवली व भाईंदरवरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. बोरीवली स्थानकात उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा रिक्षाने गोराईला पोहोचा. तिथून लाँचने तुम्हाला गोराई किनाऱ्यावर जाता येते.

येऊर – येऊर हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. पक्षी निरीक्षण आणि जंगल भ्रमंतीची तुम्हाला आवड असेल तर एकदा येऊरला नक्की भेट द्या. छोटया-छोटया टेकडया आणि जंगलामुळे इथे भटकंती करताना एक वेगळा आनंद मिळतो.