Krushi Sevak bharati 2023 : गुड न्यूज – कृषी विभागात लवकरच दोन हजार कृषी सेवकांची भरती, भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Krushi Sevak bharati 2023 : महाराष्ट्र कृषि विभागात नोकरी (Job) करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.कृषि विभागात (Agricultural Department Recruitment 2023) लवकरच 2 हजार कृषि सेवकांची पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिली आहे. (Sunil Chavhan IAS)

Krushi Sevak bharati 2023, Good News, Agriculture department will soon recruit 2 thousand krushi sevak, when will the recruitment process start, know in detail

कृषि विभागाच्या आयुक्तालयाच्या अधिनस्त  कृषि सेवक पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे.कृषि सेवकांची 2 हजार 588 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 80 टक्के म्हणजेच 2 हजार 70 पदांची भरती करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिली. (Agriculture Commissioner Sunil Chavan)

कृषि आयुक्तांच्या अधिनस्त गट क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पद भरती बाबत प्रक्रिया सुरू झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झाला नसल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादीत पदभरती केली जाणार आहे.

गट क वर्गातील पदभरती IBPS कंपनीमार्फत राबली जाणार आहे, त्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधिक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदांच्या भरतीची जाहिरात कृषि विभागाने प्रसिद्ध केली आहे.

राज्यपाल महोदयांच्या 29 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार अनूसुचित/ आदिवासी क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये कृषि सहायक संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार विभागीय कृषि सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करुन घेण्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही, मात्र मान्यता मिळताच भरती संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे सुनिल चव्हाण यांनी सांगितले.