ओव्हल (लंडन), ४ ऑगस्ट २०२५: भारताने इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत जोरदार कमबॅक केलं. या विजयामुळे भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आणि एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी आपल्या नावावर कायम ठेवली. मोहम्मद सिराज हा भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला. सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला.

पाचव्या कसोटीच्या अंतिम दिवशी इंग्लंडला विजयासाठी अवघ्या ३५ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे ४ विकेट शिल्लक होत्या. जो रूट (१०५) आणि हॅरी ब्रूक (१११) यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांच्या खेळीमुळे इंग्लंडला सहज विजय मिळेल असेच वाटत होते. परंतू भारतीय गोलंदाजांनी अफाट संयम आणि अचूक गोलंदाजी करत सामना पूर्णतः फिरवला. मोहम्मद सिराजने ५ विकेट्स घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट्स घेतल्या.
अवघ्या अर्ध्या तासात इंग्लंडचा गेम ओव्हर
सामन्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात इंग्लंडने ३ विकेट्स गमावल्या. प्रसिद्ध कृष्णाने पहिल्यांदा बेन डकेटला जाळ्यात अडकवले. त्यानंतर अँटकिन्सनला मोहम्मद सिराजने शानदार यॉर्कर वर क्लीन बोल्ड करत सामना संपवला. क्रिस वोक्स शेवटपर्यंत नाबाद राहिला, पण त्याला स्ट्राइक मिळालाच नाही. आणि भारताने पाचवा सामना ६ धावांनी जिंकून इतिहास घडवला आणि कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
मोहम्मद सिराजचे जबरदस्त प्रदर्शन
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा पाचव्या कसोटी सामन्याचा नायक ठरला. त्याने अंतिम डावात ५ बळी घेतले. त्याने भेदक गोलंदाजी करत भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला.
पाचव्या दिवशी सकाळी सिराजने जेमी स्मिथला झेलबाद करत भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. त्यानंतर लगेचच जेमी ओव्हर्टनला त्याने LBW करून इंग्लंडच्या खालच्या फळीला हादरवले. या दोन्ही विकेट्सने इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये मोठी अस्थिरता निर्माण केली.
सामन्याचा निर्णायक क्षण म्हणजे सिराजने गस अॅटकिन्सनला एका अचूक यॉर्करवर बोल्ड केले. हाच तो शेवटचा बळी ठरला आणि भारताने अवघ्या ६ धावांनी विजय मिळवला. ही सिराजच्या कारकिर्दीतील सर्वांत संस्मरणीय कामगिरींपैकी एक ठरली.
गिलने केले सिराजचं भरभरून कौतुक
भारताचा कर्णधार शुभमन गिलने सामन्यानंतर सिराजचं भरभरून कौतुक केलं. “जेव्हा आम्ही हरतोय असं वाटत होतं, तेव्हा सिराजने आत्मविश्वासानं गोलंदाजी केली. त्याचं समर्पण आणि जिद्द हीच आमचं सामर्थ्य ठरली,” असं गिल म्हणाला.
हायलाइट्स : भारत विरुद्ध इंग्लंड, ५वी कसोटी
भारत १ला डाव: २२४
इंग्लंड १ला डाव: २४७
भारत २रा डाव: ३९६
इंग्लंड २रा डाव: ३६७ (all out)
निकाल : भारत ६ धावांनी विजयी
मालिका निकाल: २–२ बरोबरी
भारत विरुद्ध इंग्लंड – पाचवी कसोटी धावफलक
स्थळ: द ओव्हल, लंडन
दिनांक: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५
निकाल: भारत ६ धावांनी विजयी
मालिका निकाल: २–२ अशी बरोबरी
पहिला डाव : भारत – २२४ धावा (६९.४ षटके)
करुण नायर – ५७
साई सुदर्शन – ३८
वॉशिंग्टन सुंदर – ३१
इंग्लंडचे प्रमुख गोलंदाज:
जोश टंग – ४ बळी
क्रेग ओव्हर्टन – ३ बळी
इंग्लंड पहिला डाव – २४७ धावा (५१.२ षटके)
झॅक क्रॉली – ६४
हॅरी ब्रूक – ५३
भारताचे प्रमुख गोलंदाज:
मोहम्मद सिराज – ४ बळी
प्रसिध कृष्णा – ४ बळी
भारत दुसरा डाव : ३९६ धावा (८८ षटके)
यशस्वी जैस्वाल – ११८
आकाश दीप – ६६
वॉशिंग्टन सुंदर – ५३
इंग्लंडचे प्रमुख गोलंदाज:
क्रेग ओव्हर्टन – ३ बळी
गस अॅटकिन्सन – ३ बळी
इंग्लंड दुसरा डाव– ३६७ धावा (१०४.१ षटके)
हॅरी ब्रूक – १११
जो रूट – १०५
भारताचे प्रमुख गोलंदाज:
मोहम्मद सिराज – ५ बळी
प्रसिध कृष्णा – ४ बळी
सामना आणि मालिका निष्कर्ष:
- भारताने पाचवा कसोटी सामना ६ धावांनी जिंकला
- मालिकेतील पाचही सामने खेळल्यानंतर मालिका २–२ अशी बरोबरीत संपली
- “अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी” दोन्ही संघांनी सामायिक केली