उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला मोठी चालना, जागतिक बँकेच्या मदतीने पूर्ण होणार प्रकल्प !
Krishna-Bhima Stabilization Project : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणार्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी चालना दिली. जागतिक बँकेच्या मदतीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा आढावा घेतला. (Krishna-Bhima stabilization project, DCM Devendra Fadanvis)
मराठवाड्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण या प्रकल्पाला गती देण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण या प्रकल्पात जोखीम गृहित धरुन जलव्यवस्थापन, पूर व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत. यामुळे मराठवाड्याला या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय, नाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4643 कोटी रुपये खर्च येणार असून, सिंचनक्षमता वृद्धीसाठी 155 प्रकल्पांच्या कॅनॉल दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 5035 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.
पहिल्या टप्प्यात ही सुमारे 10,000 कोटींची कामे केल्यानंतर दुसर्या टप्प्यात आणखी 38 अपूर्ण प्रकल्प पूर्णत्त्वास नेली जाणार आहेत. अशी एकूण 15,000 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पांसाठी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. आता नव्याने सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीने पूर्ण करता येईल. शिवाय, नियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नाही. खा. संजयकाका पाटील, मुख्य सचिव नितीन करीर, मित्रा सीईओ प्रवीण परदेशी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, नाबार्ड अधिकारी तसेच राज्याच्या विविध विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.