शेतकऱ्यांनो लक्ष द्या! रब्बी हंगामासाठी पीक विमा नोंदणी सुरू – अर्ज करण्याची अंतिम मुदत जाहीर, किती मिळेल विमा संरक्षण? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  सन २०२५-२६ च्या रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाली असून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल https://www.pmfby.gov.in वर करून घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Attention farmers, Crop insurance registration for Rabbi season begins, application deadline announced, how much insurance coverage will you get? Know complete information, rabbi pik vima 2025,
  • नोंदणीसाठी शेवटच्या तारखा:
  • ज्वारी पिकासाठी: ३० नोव्हेंबर २०२५
  • गहू, हरभरा, कांदा: १५ डिसेंबर २०२५
  • उन्हाळी भुईमूग: ३१ मार्च २०२६

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळते. रब्बी हंगामासाठी पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ही योजना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • ॲग्रीस्टॅक नोंदणी (Farmer ID)
  • आधार कार्ड
  • बँक खाते तपशील
  • जमीन धारणा उतारा
  • नोंदणीकृत भाडेकरार (भाडेपट्टी शेतीसाठी)
  • ई-पीक पाहणी अनिवार्य

शेतकऱ्यांनी फक्त ठरलेला विमा हप्ता भरावा, अन्य कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. सीएससी केंद्राला प्रति शेतकरी ₹४० चे मानधन विमा कंपनीकडून दिले जाते.

फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई

जर कोणी बनावट कागदपत्रे देऊन योजनेचा लाभ घेतला, तर त्यांना ५ वर्षे काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

जिल्हानिहाय विमा रक्कम आणि हप्ता

  • अहिल्यानगर जिल्हा:
  • गहू (बागायत): ₹४५,००० (हप्ता ₹४५०)
  • ज्वारी / हरभरा: ₹३६,००० (हप्ता ₹३६०)
  • कांदा: ₹९०,००० (हप्ता ₹९००)
  • उन्हाळी भुईमूग: ₹४०,६०० (हप्ता ₹१०१.५०)
  • पुणे जिल्हा:
  • गहू (बागायत): ₹४५,००० (हप्ता ₹२२५)
  • ज्वारी / हरभरा: ₹३६,००० (हप्ता ₹९०-१८०)
  • कांदा: ₹९०,००० (हप्ता ₹९००)
  • उन्हाळी भुईमूग: ₹४०,६०० (हप्ता ₹१०१.५०)
  • सोलापूर जिल्हा:
  • गहू (बागायत): ₹३८,००० (हप्ता ₹३८०)
  • रब्बी ज्वारी (बागायत): ₹३६,००० (हप्ता ₹३६०)
  • रब्बी ज्वारी (जिरायत): ₹३०,००० (हप्ता ₹३००)
  • हरभरा: ₹३२,६७५ (हप्ता ₹३२६.७५)
  • कांदा: ₹९०,००० (हप्ता ₹४५०)
  • उन्हाळी भुईमूग: ₹४०,६०० (हप्ता ₹१०१.५०)

विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी विभागास केंद्र शासनाने निर्धारित केलेले प्रति शेतकरी ४० रुपये मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही.

  • 📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
  • हेल्पलाईन: १४४४७
  • वेबसाइट: https://krishi.maharashtra.gov.in
  • स्थानिक कृषी विभाग / भारतीय कृषी विमा कंपनी कार्यालय

शेतकऱ्यांनो, आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी विहित मुदतीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवा आणि नैसर्गिक संकटांपासून आपल्या शेतीचे रक्षण करा!