गायरान क्षेत्रावरील खासगी आस्थापनांसह व्यापारी संकुलांबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोठे वक्तव्य
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणांचा चांगलाच तापला आहे. गायरान जमिनींवरील अतिक्रमण धारक कुटुंबांना सरकारकडून दिलासा दिला जाईल असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगुंटीवर यांनी केलेले असतानाच राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरमध्ये एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
![Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil's big statement regarding commercial complexes with private establishments on Gayran area](http://jamkhedtimes.com/wp-content/uploads/2022/11/Revenue-Minister-Radhakrishna-Vikhe-Patils-big-st-1024x576.jpg)
सर्वोच्च न्यायालयाने सन 2011 मध्ये दिलेल्या आदेशानुसार शासनामार्फत काम करण्यात येत आहे. गायरान क्षेत्रामध्ये झालेल्या अतिक्रमणामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भूमिहिन तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतच्या लाभार्थ्यांची प्रकरणे नियमानाकूल करण्यात येत आहेत.
![](http://jamkhedtimes.com/wp-content/uploads/2022/11/Shital-jamkhed--1024x1024.jpg)
परंतू, गायरान क्षेत्रावर खासगी आस्थापना अथवा व्यापारी संकुलाची उभारणी झाली असेल तर अशांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरमध्ये बोलताना दिली.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये ज्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, त्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.