आयुष्मान कार्ड 2025 : तुम्ही आयुष्मान भारत गोल्डन कार्ड बनवले आहे का? बनवले नसेल तर ‘या’ तारखेपर्यंत पटकन बनवा, नाही तर होईल मोठं नुकसान

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ayushman Card 2025 : केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य ही महत्वाकांक्षी योजना (AB-PMJAY) आता नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तब्बल ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ देशातील सरकारी व सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्ये मिळतो. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की हे आयुष्मान कार्ड (Ayushman Card 2025) कसं काढायचं? त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? चला तर मग पाहूया स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन.

Oh my god, There are so many lakh Ayushman card holders in Ahilyanagar district, are you included in the list? If not, then get your card done quickly by this date; otherwise there will be big loss,

अहिल्यानगर जिल्ह्यात १० लाख ५५ हजार कुटुंबांचा समावेश असून, यामधील ४१ लाख ६५ हजार लाभार्थी आयुष्मान कार्डसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढावेत, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेत नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.

आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना

जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना “आयुष्मान भारत वय वंदना कार्ड” च्या माध्यमातून अतिरिक्त ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

Oh my god, There are so many lakh Ayushman card holders in Ahilyanagar district, are you included in the list? If not, then get your card done quickly by this date; otherwise there will be big loss,

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड स्वतः लाभार्थी, आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र तसेच स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्यामार्फत सहज उपलब्ध आहे. तसेच गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान अॅप” डाउनलोड करूनही सुविधा मिळू शकते.

आयुष्मान कार्ड काढण्यासाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी

लाभार्थ्यांनी कार्ड तयार करण्यासाठी या पोर्टलवर भेट द्यावी किंवा गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान अॅप” डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी. आधार क्रमांक, रेशन कार्ड व नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या आधारे ओटीपी टाकून नोंदणी करता येते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून, छायाचित्रासह अर्ज सादर करून कार्ड डाउनलोड करता येते. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड व लाभार्थ्याचा जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

३१ ऑगस्ट २०२५ यापर्यंत विशेष मोहीम

लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ३१ ऑगस्ट २०२५ यापर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व सरपंच यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, आयुष्यमान कार्डच्या दैनंदिन प्रगतीवर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत.

आयुष्मान कार्ड काढण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

1. पात्रता तपासा – अधिकृत आयुष्मान भारत बेनिफिशरी पोर्टल किंवा मोबाईल अॅपवर जाऊन मोबाईल नंबर टाकून लॉग-इन करा. राज्य निवडा आणि नाव/आधार/ration कार्डद्वारे शोधा. नाव यादीत असल्यास पुढे प्रक्रिया करा.

2. eKYC पूर्ण करा – BIS (Beneficiary Identification System) मध्ये आधार-आधारित पडताळणी, फोटो व कुटुंबीयांची माहिती भरा.

3. कार्ड डाउनलोड करा – पडताळणी पूर्ण झाल्यावर “Download Card” पर्यायाने तुमचे ई-कार्ड (PDF) डाउनलोड करा. हेच कार्ड प्रिंट करून वापरता येते.

4. ऑफलाइन सुविधा – जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा सूचीबद्ध रुग्णालयात जाऊन “आयुष्मान मित्रा” कडून आधारासह eKYC करून कार्ड काढता येते.

5. रुग्णालय शोधा – उपचारासाठी जवळचे सूचीबद्ध रुग्णालय अधिकृत पोर्टलवर शोधता येते.

आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
  • Ration कार्ड / SECC यादी नोंद (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • राज्य सरकारने मान्य केलेले ओळखपत्र

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष माहिती

महाराष्ट्रात ही योजना महत्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत यांचा संयुक्त स्वरूपात राबवली जाते. पात्रतेनुसार नागरिकांना ration कार्ड व वैध ओळखपत्र दाखवून उपचार मिळतात.

त्यामुळे अजूनही तुमचं आयुष्मान भारत कार्ड काढलं नसेल, तर त्वरित प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा लाखो रुपयांचा मोफत उपचाराचा लाभ तुमच्या हातातून निसटू शकतो!

आयुष्मान भारत कार्ड संदर्भातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आयुष्मान भारत कार्ड म्हणजे काय?

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत दिले जाणारे एक गोल्डन कार्ड आहे. यामुळे प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळतात.

2. अहिल्यानगर जिल्ह्यात किती लाभार्थी पात्र आहेत?

अहिल्यानगर जिल्ह्यातील १० लाख ५५ हजार कुटुंबांपैकी ४१ लाख ६५ हजार नागरिक पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत १८ लाख २३ हजार नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार केले आहेत.

3. आयुष्मान कार्ड काढण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे?

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नवीन आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख आहे.

4. आयुष्मान भारत कार्डचा फायदा काय ?

या कार्डवरून लाभार्थ्यांना – प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचार मोफत मिळतात, ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी “आयुष्मान भारत वय वंदना कार्ड” द्वारे आणखी ५ लाखांची सुविधा मिळते.

5. आयुष्मान कार्ड कसे काढता येते?

हे कार्ड मिळविण्यासाठी – आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच, गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान अॅप” डाउनलोड करून किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या पोर्टलवरून अर्ज करू शकता.